
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466

उमरखेड (दिनांक 10 जून) शहरातील 20 ग्राहक यांना महावितरण अभियंता व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे 24 तासानंतरही अंधारात राहावे लागत आहे.
पावसाळा लागताच महावितरण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आले आहे. काल पासून अवकाळी पावसाने हजरी लावातच महावितरण वीज वीस घंटे गायब झाल्याने विद्युत ग्राहकांना अंधारात झोपावे लागले सुदैवाने रात्री चा फायदा घेऊन चोरट्यानी चोरी केली नाही. ना पावसाळ्यात साप, विंचू व विषारी साप चावण्याची घटना घडली नाही. पण महावितरण कंपनीचा असाच भोंगळा कारभार राहिला तर हे घटना घडली तर याचा सर्वस्व जबाबदार महावितरण विभागाला धरावे असे नागरिक म्हणत आहे.


महावितरण विभागाने पावसाळा लागण्याआधी जर का दर महिन्याला मेन्टनसं करून ट्री कटिंग, विद्युत तारा भवती कुजलेले वाळलेले झाडे तोडणे,आलेला विद्युत एम्पर व जंपर चेक करून वोअर लोड कनेकशन चे विभाजन केले असते तर आज विद्युत पुरवठा वीस घंटे खंडित होत नव्हता.

आज महावितरण च्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आळशी कामामुळे वीस वीस तास विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे कंपनी ला लाखोचा चुन्ना लागत असून विद्युत ग्राहक परेशान आहे.महावितरण विभागाचा भोंगळा कारभार बगुन सुद्धा कार्यकारी अभियंता कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

“फक्त वीज ग्राहकाकडून बिल वसुली करिता मोठी टीम घेऊन दादागिरीने वसुली करतात. हे मात्र विशेष”

या विभागाचे लोकप्रतिनिधी खासदर नागेश पाटील आष्टीकर व आमदार किसनराव वानखेडे नुसती बगग्याची भूमिका करत असल्याचे संताप नागरिक व्यक्त करत आहे.